उत्तूर (कोल्हापूर) : येथील श्री. शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या श्री पार्वती शंकर शैक्षणिक संस्था संचालित श्री.पार्वती शंकर विद्यालयाचे ५ विद्यार्थी पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालय यांच्या वतीने एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये निखील देऊस्कर (१४८) राज्यात ३३ वा, श्रेयस देशमाने (१३९) राज्यात २१ वा, निशांत मातले (१३६) २४ वा, रोहित कसबेकर (१८५) राज्यात २१ वा, ओंकार सारोळकर (१७९) २७ वा यांचा समावेश आहे.
जिल्हास्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निमिष पाटील (१४२) जिल्ह्यात पाहिला, उत्कर्ष बिल्ले (१३८) जिल्ह्यात पाचवा, सानिध्य रावण (१३८) जिल्ह्यात पाचवा, सुयाग लोखंडे (१२८) जिल्ह्यात तिसरा, भूषण बोरनाक (१२५) जिल्ह्यात सहावा, प्रणव फराकटे (१७४) जिल्ह्यात तिसरा, तसेच स्पेशल बक्षिसासाठी १३ विद्यार्थी, तालुकास्तरीय शिष्यवृत्तीसाठी दोन विद्यार्थी व कंसोलेशन प्राईज १ , प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी ३५ या सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उज्जवल यश संपादन केले आहे. या परीक्षेत सर्वाधित यश मिळवणारी श्री. पार्वती शंकर विद्यालय ही एकमेव शाळा आहे. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एम. यु. शिकलगार वा शिक्षक व्ही. टी. पाटील, पी. एस. वंजारे, पी. एन. केसरकर, बी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
संस्थेचे अध्यक्ष बसवतराज अण्णा कंरबली, उपाध्यक्ष विश्वनाथ अण्णा करंबळी, सचिव सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही. एम. पाकले, प्रा. डॉ. दिनकर घेवडे, विजय सावेकर यांच्याकडून वेळोवेळी प्रेरणा व कामाची दिशा मिळाली. यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेने मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.